
बापुसाहेब भुजबळांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक
बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीवर नाशिकमध्ये ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य करत राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर ओबीसी आणि भटक्या समाजात आमचं आरक्षण संपलं, असा ठाम विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात चौदा ते पंधरा अतामहत्या झाल्याचे सांगत या जीआरमुळे भटक्या समाजात मोठा भ्रम निर्माण झाला असून पुढे काय होईल याची चिंता त्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे भुजबळांचे बंधू बापुसाहेब भुजबळ हे बीडमध्ये डेरेदाखल असून त्यांच्या उपस्थितीत 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये होणार्या जाहीर मेळाव्याबाबतची बैठक होत आहे. या बैठकीत मेळाव्याच्या नियोजनाबरोबर अन्य महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली जात आहे.
अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी नियोजीत असलेला ओबीसींचा मेळावा रद्द झाला. त्यानंतर आता हा छगन भुजबळांच्या उपस्थितीतील मेळावा बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचे नियोजन व अन्य बाबींबाबत महत्वपूर्ण बैठक मंत्री छगन भुजबळ यांचे बंधू बापुसाहेब भुजबळ यांच्या उपस्थितीत बीडच्या नीलकमल हॉटेलमध्ये सुरू आहे. या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ओबीसी संघटनांचे नेते-पदाधिकारी उपस्थित असून जिल्हा बाहेरूनही काही लोकांनी उपस्थिती दर्शविली आहे. एकीकडे ही बैठक सुरू असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये आज छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व विखे पाटील यांच्यात जी भेट झाली त्यावर त्यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, त्यांची ही भेट मी टीव्हीवर पाहिली, विखे पाटील मंत्रीमंडळ किंवा पक्षाचा निरोप घेऊन जरांगे यांना भेटले होते की नाही याची आपल्याला माहिती नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींची भूमिका मांडताना भुजबळ म्हणाले, मागासवर्गीय आणि ओबीसी वर्ग मोठा आहे आणि ते कुठल्या एका जातीसाठी लैत नाहीत. ओबीसी समाजाच्या डीएनएचा संदर्भ देत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीची आठवण करून दिली. सध्या त्यांना (मराठा समाजाला) आरक्षणाची आवश्यकता आहे की नाही, हे मला माहित नाही, असे विधान करून मराठा मुख्यमंत्री होते, ते सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचे, आता मात्र तसं होत नसल्याचे भुजबळांनी सांगितले.








