रोज पाच हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप होणार
केज (रिपोर्टर) केज तालुक्यामध्ये गेल्यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. ऊसउत्पादक शेतकरी त्रस्त झाले होते. यावर्षी मात्र कसलाही त्रास जाणणार नाही. शेतकर्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्यात आला. या कारखान्यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकर्यांना आधार मिळेल असे प्रतिपादन खा.रजनीताई पाटील यांनी केले आहे.
त्या गंगामाऊली सहकारी साखर कारखान्याच्या उदघाटनप्रसंगी ोलत होत्या. पाटील यांच्याहस्ते कारखान्यात आज मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजीमंत्री अशोक पाटील, हनुमंत मोरे, आदित्य पाटील, पशुपतीनाथ दांगट, राजेसाहे देशमुख, राहुल सोनवणे, सुरेश पाटील, बोधले महाराज, जगन्नाथ देशमुख, रणजीत महाराज, निवृत्ती मोरे, शंकर भिसे, लक्ष्मण मोरे, सिध्दार्थ भिसे, प्रताप मोरेसह आदिंची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.रजनीताई पाटील म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे ऊसाचे उत्पादन वाढले. गेल्यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. यावर्षी तालुक्यातील ऊसाचा प्रश्न सुटणार आहे. तालुक्यातील शेतकर्यांना इतर कारखान्याकडे जाण्याची गरज नाही. गंगामाऊली सहकारी साखर कारखाना शेतकर्यांसाठी वरदान ठरेल असे सांगत पाटील पुढे म्हणाल्या की, तालुक्यासह इतर शेतकर्यांचाही ऊस गाळप केला जाणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान सदरील कारखान्यामध्ये दररोज पाच हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप होणार आहे.