मुंबई (रिपोर्टर) काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भाजपच्या संसदीय समितीमधून गच्छंती झाली होती. तेव्हापासून नितीन गडकरी यांना भाजप पक्षसंघटनेत बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांची अलीकडच्या काळातील अनेक वक्तव्यं ही एकप्रकारचा गर्भित इशारा असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांचे दिल्लीतील राजकारणाविषयीचे विधानही चर्चेचा विषय ठरत आहे.
मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून लौकिक कमावलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी दिल्लीतील राजकारणासंदर्भात भाष्य केले आहे. मी राजकारणात गेल्यानंतर दिल्लीला गेलो. आजपर्यंत अनेक लोकांना भेटलो. खूप मोठी वाटणारी माणसं खुजी निघाली. छोटी वाटणारी माणसं उत्तुंग होती. असे अनेक अनुभव घेतले. पण दिल्लीचे पाणी चांगले नाही. आपला महाराष्ट्रच चांगला आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईच्या आयआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यामुळे गडकरी यांचा ’खुजी लोकं’ या वक्तव्याचा रोख नेमका रोख कुणाकडे? अशी चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भाजपच्या संसदीय समितीमधून गच्छंती झाली होती. तेव्हापासून नितीन गडकरी यांना भाजप पक्षसंघटनेत बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांची अलीकडच्या काळातील अनेक वक्तव्यं ही एकप्रकारचा गर्भित इशारा असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांचे दिल्लीतील राजकारणाविषयीचे विधानही चर्चेचा विषय ठरत आहे.