गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथील एका 22 वर्षीय तरुणाचा रात्री संशयास्पद मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी करण्यात आले. हा प्रकार खुनाचा आहे की काय? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22 वर्षे) याचा रात्री 11 वा. दरम्यान मृत्यू झाला. गेल्या एक महिन्यापूर्वीच या तरुणाचे लग्न झाले होते. या तरुणाच्या मृत्यूबाबत तर्क वितर्क लावले जातआहेत. त्याचे आज सकाळी शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर सदरील खरा प्रकार उघडकीस येणार आहे.