पात्रुड (रिपोर्टर) सोयाबीन काढून शेतामध्ये लावलेल्या गंजीला काल अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये तीन ते चार लाख रूपयाचे नुकसान झाले. सोयाबीनसह तुषारचा संचही जळून खाक झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. ओम हरि जंगले यांनी गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या शेतातील सोयाबीन काढून त्याची गंज लावली होती. काल या सोयाबीनच्या गंजीला अचानकपणे आग लागली. या आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. त्याच बाजूला तुषारचा संच होता. तोदेखील जळाला. याबाबत जंगले यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तहसिल विभागाला याची माहिती कळवल्यानंतर पात्रुड सज्जाचे तलाठी संघर्ष ओवे, मंडलअधिकारी, सय्यद नुरभाई, मोमीन मुस्ताक, लक्ष्मण शितकर, राजाराम जंगले यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.