गणेश सावंत
मो. नं. 9422742810
नपुंसक असलेला पुरुष जेव्हा आपलं पुरुषत्व दाखवण्यासाठी बायकोच्या पोटावर गाठोडे बांधतोे, तिला गावभर फिरवून आपण बाप होणार असल्याचा देखावा निर्माण करतो. परंतू दिवसामागून दिवस गेल्यानंतर सत्य ते सत्य सुर्यप्रकाशाइतके बाहेर पडते आणि तो षंढच आहे हे गावभर समजते. तशाच पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसूभरही कर्तृत्व नसलेल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसासाठी काहीच न केलेल्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृपितृ संघटना आज पुन्हा हिंदुत्व आणि सर्वसामान्यातील सर्वसामान्यांसाठी आम्हीच सर्वकाही केलं, आमच्याच पुर्वजांनी सर्वकाही लढे दिले याचा देखावा आणण्याचा प्रयत्न करतेय. असो त्यांच्या दिखावूबाज पुरुषत्वाबाबत आम्हाला देणं घेणं नाही परंतू जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना या ना त्या कारणावरून खुजं करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराजांच्या इतिहासाला नख लावण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा आम्हीच काय, महाराष्ट्रात निपजलेला खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा स्वस्थ बसणार नाही. अशा षंढ कर्तृत्ववान लोकांचा समाचार तोही अभ्यासपूर्व घेवू. गेल्या काही दिवसांपासून महाराजांबाबत, राष्ट्रमाता जिजाऊ बाबत, त्यांच्या इतिहासाबाबत अत्यंत खोटारडा घाणेरडा प्रचार केला जातोय. मग तो चित्रपटातून असो, सोशलमिडियातून असो, लिखानातून असो ही जी निच वृत्ती आहे आणि हे जे निच साहित्य आहे ते आता ठेचावंच लागेल. आज पुन्हा हा विषय
सावरकरांची माफी
यावरून चर्चेत आलाय. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असे म्हणत माफी नाम्याचे पत्र जगजाहीर करून टाकले. ते पत्र सत्य आहे, ती माफी खरी आहे परंतू आम्ही म्हटल्याप्रमाणे पुरुषत्व नसतांना पुरुषत्व दाखवण्याच्या तयारीत भारतीय जनता पार्टीने सावरकरांच्या माफीवरून राज्यात नव्हे तर देशभरात गदारोळ माजवायला सुरूवात केली. भाजपाचे प्रवक्ते, भाजपाचे नेते, सावरकरांच्या माफीनाम्यावरून सावरकरांनी माफी मागितलीच नव्हती असा डांगोरा पिटू लागले. मात्र दस्तूखूद सावरकरांच्या वंशजांनी ते पत्र खरे आहे हे बोलून दाखवलं. बहूदा गेल्या महिन्यात भाजपाचे राजनाथसिंह यांनीही सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती अशी कबूली देत पुरुषत्व सिद्ध करण्याहेतू ती माफी गांधींच्या सांगण्यावरून मागितली होती असा सपशेल खोटारडेपणाचा शोध राजनाथसिंहांनी कोठून लावला, त्यांनाच माहिती. आश्चर्य याचं वाटतं आरं तुम्ही काही केलंच नसेल, तुमच्या मातृसंस्था इंग्रजांचे गुलाम असतील तर तुमच्याकडून क्रांतीची आणि पुरुषत्वाची भाषा ऐकणे अथवा पचवून घेणे हे कुंच्याही भारतीयाला पटणार नाही. गेल्या आठवडाभराच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चित्रपटांमधून, भाज्यपाल (राज्यपालाच्या) वक्तव्यामधून भाजपाच्या प्रवक्त्याकडून सातत्याने मानहानीकारक वक्तव्य केले जातात. छत्रपतींना खुजं करण्याचा केविलवाना प्रयास केला जातो. सावरकरांची आणि छत्रपतींची बराबरी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू इतिहास साक्षीलाय, हे ब्रम्हांड साक्षीलाय, जोपर्यंत चंद्र-सूर्य असेल, ही पृथ्वी असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, त्यांचा इतिहास तळपत्या सूर्यासारखा तेजोमय असेल. त्याला आपल्या हाताच्या पंजाने झाकण्याचा प्रयास भाजपीयांनी नाही केला तर बरंच राहिल. कधी गांधींना खुजं करायचं, कधी छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करून आपलं वर्चस्व सिद्धीस नेहण्याचा प्रयत्न करायचा आणि मुळ प्रश्नांना बगल देयची हे हास्यास्पदच म्हणावे. राजनाथ सिंहांच्या त्या वक्त्यावर विनायक होगाडे या प्रसिद्ध लेखकांचे आणि अभ्यासकांचे मत जेव्हा आम्ही वाचले आणि त्याच्यातली सत्यता पाहितली तेव्हा
सावरकरांचे राम आणि गांधींचे प्रभूराम
आम्हाला इथंच दिसले. सावरकरांनी पहिला माफीनामा लिहलार तो 29 ऑगस्ट 1911 रोजी… मोहनदास करमचंद गांधी हा माणूस दक्षिण अफ्रिकेतील आपला लढा संपवून भारतात कारमस्वरुपी परतला तो 1915 साली! रावेळी गांधी हे फक्त ’मोहनदास’ होते आणि ते अजून ’महात्मा गांधी’ व्हारचे होते. त्रामुळे 1911 साली गांधींनी त्रांना तुम्ही माफीनामे लिहून स्वत:ची सुटका करवून घ्रा असं म्हणणं संभवत नाही. त्रामुळे राजनाथ सिंहाचा दावा किती पोकळ आहे, हे सहजपणे लक्षात रावं. मात्र, गांधी आणि सावरकर रांची भेट रापूर्वी देखील झाली होती. गांधी आणि सावरकर रांची पहिली जाहीर आमनासामनी झाली होती 1909 साली लंडनमधल्रा इंडिरा हाऊसमध्रे. गांधी दक्षिण अफ्रिकेतल्रा लढ्यासंदर्भात लंडनला होते. विजरादशमीच्रा दिवशीच्रा रा कार्रक्रमाचे अध्रक्ष गांधी होते. त्रावेळी सावरकर आणि गांधी दोघांनीही भाषण केलं. सावरकरांनी रामाच्रा आक्रमक’ असण्राचा मुद्दा अधोरेखित केला तर अध्रक्षीर भाषणात गांधीनी प्रजाहितदक्ष’ रामाची मांडणी केली. तेंव्हाच रा दोन्ही व्रक्ती-प्रवृत्ती राजकीर क्षितिजावरचे दोन विरोधी ध्रुव आहेत, हे इतिहासाला ज्ञात झालं होतं. रा नंतर सावरकरांना जॅक्सन खून खटला, देशद्रोह अशा आरोपांखाली अटक झाली. सावरकर अंदमानच्रा कोठडीतून सुटले ते 6 जानेवारी 1924 साली. त्रांनी इंग्रजांना आपण केलेल्रा कृत्राबद्दल खेद व्रक्त करून अनेक मर्सी पिटीशन्स अर्थात दरेचे अर्ज केले होते हे वास्तव आहे. त्रांची अंदमानातून सुटका झाल्रावरही त्रांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्रात आलं होतं. रा काळात राजकीर चळवळ ते करू शकत नव्हते. 10 मे 1937 साली पूर्ण मुक्तता झाल्रावर त्रांनी हिंदू महासभेचे नेतृत्व स्वीकारले. सावरकरांची अटक आणि सुटका रा 27 वर्षाच्रा काळात देशाचं चित्र पूर्ण पालटून गेलं होतं. स्वातंत्र्रलढ्याचा मार्ग अहिंसक सत्राग्रही बनला होता. इंग्रजांनी सशस्त्र संघटना मोडून काढल्रा होत्रा. सारा देश गांधींच्रा मागे उभा होता. अर्थातच बहुसंख्र हिंदू जनतादेखील गांधींच्रा मागेच. हे रणावाचून’ जवळ रेणारे स्वातंत्र्र पाहून सावरकर विचलित होणं स्वाभाविक होतं. गांधींच्रा रामा’ने त्रांची दिशा ठरवली होती आणि सावरकरांच्रा रामा’ने त्रांची. हे रा दोघांमधलं द्वंद्वरामारण आहे. भारताचा राम’ कोणता रातला हा संघर्ष आहे. त्रा रामाचं आंतरिक मूल्र कार असावं रातला हा संघर्ष आहे. राची परिणती झाली ती नथुराम गोडसे नावाच्रा सावरकर शिष्राने गांधींचा खून केला तेही रामाच्रा प्रार्थनेला जाताना. रा सार्रा अध्रारातही मोठी गंमत आहे. ती अशी कि, आरुष्रभर राजकीर क्रांतीची भाषा बोलून शस्त्राचार सांगणार्रा सावरकरांचा मृत्रू हा शेवटी उपोषण करून, आत्मार्पण करून व्हावा आणि रामनामाचा जप करत आमरण उपोषणासारख्रा स्वपिडा देणार्रा मार्गाचा आपल्रा राजकारणात सातत्राने उपरोग करणार्रा गांधींचा मृत्रू हा प्रार्थनेला जाताना रक्त सांडून व्हावा, हाही निरतीचा खेळच म्हणारला हवा.परंतू आता नियती खेळण्यापेक्षा स्वत:च नियती बनू पाहत इतिहासालाच तोडून मोडून आपलं पुरुषत्व सिद्धीस नेहू पाहणार्या भाजपीयांनी
जनानखान्यातले फुल प्रभूरामाच्या चरणी
अर्पन करायचं महापाप सुरू ठेवलंय. सावरकरांच्या चर्चेवरून भाजपाच्या प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने आपल्या तोंडातून विष्टा ओकलीय. तो म्हणतो सावरकरानीं माफी मागितली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली होती. अरे थुं तुमच्या जिंदगाणीवर आणि तुमच्या अभ्यासावर. तुमच्या नपुंसक कर्तृत्वावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी बसण्याची लायकी आजच्या आणि तेव्हाच्या कुठल्याही व्यक्तीची नव्हती आणि नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत खोटारडे दाखले देणे बंद करा. पुरंदरचा तह आठवतोय का? मिर्झाराजा जयसिंह लाखोंच्या फौजेसह मराठा मूलखात आला होता. गावे बेचिराख केली जात होती, शेती उध्वस्त केल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव सोन्या चांदीत नाही, गडकोटात नाही तर तो रयतेत आहे. म्हणून रयतेला छळलं जात होतं अशा वेळी गणीमीकावा म्हणून छत्रपतींनी तहाची भुमिका घेतली. 23 किल्ले राजा जयसिंहांना देवून औरंगजेबाची भेट घेणे स्विकारले, याला तुम्ही माफीनामा म्हणता, लाजा धरा लाजा. अरे तेच छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबरात पोहचले, मागच्या रांगेत उभे केले म्हणून गिल्लत उधळत अपमान सहन करणार नाही असं ठणकावून सांगणारा हाच माझा राजा होता. माफी नामा लिहून देणारा नव्हता. हे तुम्हाला कानफटात हानून सांगावं लागेल. किती हा द्वेष म्हणावा. आपली कार्यसिद्धी आणि त्या कार्यसिद्धीचा इतिहास नाही म्हणून इतिहास पुरुषांना, युग पुरुषांना स्वातंत्र्यविरांना क्रांतिकर्यांना अहिंसेच्या प्रवर्तकांना किती बदनाम करणार आहेत. आम्हाला जिजाऊ माँसाहेबांचं एक वाक्य आठवतं, आई जगदंबेच्या गळ्यातील माळेचे मोगर्याचे फुल आणि जनानखान्यातल्या गजर्यातील मोगर्याचे फुल एकच असते. जागा स्थान बदलले की त्याचे महत्त्व कमी जास्त होते. आज भाजपीय आपलं अस्तित्व, कर्तृत्व, पुरुषत्व दाखवण्यासाठी खोटारड्या पद्धतीने समोर येत आहेत आणि प्रभूरामाच्या चरणी आपल्या खोटारडेपणाचा प्रचार करण्याहेतू जनानखान्यातलं फुल अर्पन करत आहेत, शेम शेम. हा आजचा प्रयत्न नाही. इ.स.2004 साली बीडमधील सावरकर महाविद्यालयामध्ये उपासनिक नावाच्या व्याख्यात्याने सावरकरांच्या माफिची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली होती. संतापजनक शब्द उच्चारले होते. तेव्हा आम्हीच यावर भाष्य केले होते. त्यावेळी सावरकर विद्यालयावर हल्लाही झाला होता. उपासनिक याच्यावर बीड शहर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पून्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत बरोबरी करण्याचा प्रयास आणि खोटारडा इतिहास पसरवण्याचे काम होतेय. त्याविरूध्द आवाज उठवलाच गेला पाहिजे.