बीड (रिपोर्टर) आसरडोह साठवण तलावात आसरडोह-मोरफळी येथील शेतकर्यांची जमीन पाटबंधारे विभागाने अधिग्रहीत केलेली आहे. त्या शेतकर्यांना मावेजा द्यावा, असा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे मात्र याला दोन वर्षे उलटले तरी देखील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बीड यांनी कुठलीही कार्यवाही केली नसल्याने शेतकर्यांचा तब्बल 15 कोटींचा मावेजा रखडला आहे तो शेतकर्यांना तात्काळ मिळावा यासाठी पाटबंधारे विभागात अॅड. एस.जी. पिसोरे, अॅड. डी.पी. बांगर हे उपोषणाला बसले आहेत.
धारूर तालुक्यातील आसरडोहा साठवण तलावासाठी आसरडोह-मोरफळी (ता. धारूर) येथील शेतकर्यांच्या जमीनी पाटबंधारे विभागाने अधिग्रहीत केलेल्या आहेत. हे प्रकरण माजलगाव कोर्टात सुरू होते. याबाबत न्यायालयाने शेतकर्यांना मावेजा द्यावा, असा निर्णय दिलेला आहे. या निर्णयाच्या प्रत अॅड. एस.जी. पिसोरे यांनी पाटबंधारे विभागाकडे दिलेल्या आहेत, मात्र पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही. केवळ त्यांच्या दिरंगाईमुळे दोन वर्षांपासून शेतकर्यांचे जवळपास 15 कोटी रुपये पडून आहेत. ही रक्कम शेतकर्यांना मिळावी यासाठी अॅड. एस.जी. पिसुरे यांनी पाटबंधारे विभागात वारंवार हेलपाटे मारले मात्र वकील असलेल्या एस.जी. पिसोेरे यांना अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. न्यायालयाचे आदेश असतानाही ते कुठलीही कार्यवाही करत नाहीत त्यामुळे अॅड. पिसोरे आणि अॅड. बांगर यांनी बीडच्या पाटबंधारे विभागातच आजपासून उपोषण सुरू केले आहे.