आ.संदीप क्षीरसागर,डॉ.बाबु जोगदंड यांच्या शिष्टाईमुळे चौसाळ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न पुर्णत्वाकडे
बीड (रिपोर्टर) चौसाळा व परिसरातील नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला चौसाळा-पाचंग्री-गोलंग्री या रस्त्याचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या अडीच वर्षापासून रखडले होते. जुनी निविदा 70 लाखाची असतांना कामाची सागर कन्स्ट्रक्शनने सुरूवातही केली होती. पण या भागातील काही नागरिकांनी मावेजा मिळावा या करिता या रस्त्याचे काम गेल्या अडीच ते तीन वषार्पासून रोखले होते. यात आ.संदीप क्षीरसागर, डॉ.बाबु जोगदंड यांनी शिष्टाई करून पोलीस प्रशासन,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामस्थांशी वेळोवेळी चर्चा करून आणि सदरील रस्त्याची फेर निविदा करून आज पोलीस बंदोबस्तासह खडीकरण व डांबरीकरणासह साईट पिचींगच्या कामाची प्रत्यक्षात सुरूवात झाली असून भविष्यात आपसात चर्चा करून ग्रामस्थांनी आपल्या गावातील विकास कामा बाबतीच्या अडचणी समन्वयाने दूर कराव्यात असे वक्तव्य या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाच्या सुरूवाती प्रसंगी उद्घाटन करतांना आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
ग्रामीण भागात विशेषत: चौसाळा जि.प.गटात गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापितांच्या राजकारणामुळे रस्ता, पाणी आणि विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या होत्या. वीजे अभावी शेतकरी हवालदील झाला होता तर पाण्यासाठी माता भगिणी डोक्यावर हंडा घेवून भटकंती करत होत्या व या चौसाळा-पाचंग्री-गोलंग्री रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून वाहतुक करावी लागत असे. तसेच रात्रीच्या वेळी या खराब रस्त्यामुळे वाहतुक करणार्यासोबत लुटमारीचे अनेकदा प्रकार घडलेले आहेत. रस्त्याअभावी शेतीपुरक माल आणण्यास किंवा बाजारात नेण्यास कायम विलंब होत असल्या कारणाने शेतकर्यांना आर्थिक नुकसान होत होते. यावर पाठपुरावा करून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून सदरील रस्ता मंजुर करून घेतला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षापासून रखडले होते. या बाबतीत संबंधित अधिकार्यांशी, गावकर्यांशी समन्वय साधत आ.संदीप क्षीरसागर, डॉ.बाबु जोगदंड यांनी ही महत्त्वाची मागणी आज पुर्ण केली असून आज कामाची प्रत्यक्ष सुरुवात होते या बद्दल चौसाळा-पाचंग्री-गोलंग्री येथील ग्रामस्थांनी आ.संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले.