विहीर, रस्ते, फळबाग, गोठे, रोपवाटिकावाले पं.स. कार्यालयात चकरा मारू मारू त्रस्त
बीड (रिपोर्टर) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, रस्ते, फळबाग, गोठे, रोपवाटिकासह इतर कामे केली जातात. या कामाचे काही पैसे मजुरांच्या नावावर निघतात तर काही पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतात. कुशलचे 17.31 कोटी थकीत राहिले असून पंचायत समितीने वेळोवेळी विभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही या कार्यालयाने अद्यापपयर्ंत पैसे दिलेले नाही. कुशलच्या बिलासाठी संबंधित लाभार्थी पं.स. कार्यालयात चकरा मारू मारू बेजार झाले आहेत. मार्च एन्डला तरी पैसे निघतील, अशी अपेक्षा होती, मात्र मार्च जावून एप्रिलचा पहिला आठवडा पुर्ण होत आहे तरीही पैसे निघालेले नाही.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, रस्ते, फळबाग, गोठे, रोपवाटीका, तलाव इत्यादी कामे केली जातात. यामध्ये कुशल आणि अकुशलसाठी निधी दिला जातो. काही पैसे मजुरांच्या नावावर निघतात तर काही पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होत असतात. मार्च एन्डला कुशलचे बिले निघणे गरजेचे होते. प्रत्येक पंचायत समिती कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे सतत पाठपुरावाही केला होता. मात्र विभागीय कार्यालयाने अद्यापही पैसे वर्ग केलेले नाहीत. बीड जिल्ह्यात जवळपास 17.31 कोटी थकलेले आहेत. कुशलच्या बिलासंदर्भात लाभार्थी पंचायत (पान 7 वर)
समिती कार्यालयात चकरा मारू मारू बेजार झालेले आहेत. कुशलचे हे बील नेमके कधी निघतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मार्च एन्ड झाला, एप्रिलचा पहिला आठवडा उलटला तरी अद्याप कुठल्याही हालचाली दिसू नयेत नाहीत. कुशलचे बिले तात्काळ काढण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.