वडवणी (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात बालविवाह प्रचंड प्रमाणात होत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे याकरिता मी स्व;ता प्रशासन म्हणुन पुढाकार घेत असून यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार आहे अशी तबी बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दिली आहे.
वडवणी येथील साळींबा रोड याठिकाणी आज सकाळी 11 वाजता विधाका शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ उपेंद्र कुलकर्णी हे होते.यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी निलम बाफना मँडम, बाबासाहेब जुजरकर,विठ्ठल नागरगोजे,नायब तहसिलदार जिंरगे,एपीआय आनंद कांगुणेसह आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे बोलत होत्या.पुढे बोलताना म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील तरुणाने नम्रपणा दाखवणे आवश्यक आहे. तसेच शेती व्यवसायात देखील नवनवे प्रयोग करून शेती व्यवसाय भरभराटीचा करणे आवश्यक आहे.यासाठी शासनाच्या आणि कृषी विभागाच्या विविध योजनेचा फायदा देखील घेतला पाहिजे. तसेच वडीलपर्जित जमीनत ताबा न मिळवता स्वतःच्या हिमतीवर शेती वाढवली पाहिजे असं मत देखील यावेळी व्यक्त करत बीड जिल्हा माझा आहे.याठिकाणी बालविवाह करण्याचे प्रमाण जास्त आहे हे रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतलाच पाहिजे, मी प्रशासक म्हणून पुढाकार घेत असून असे बालविवाह बीड जिल्ह्यात झाले तर त्यांना जेलमध्ये देखील टाकणार आहे.