2019 साली जि.प.मध्ये जागा भरण्यासाठी मागवले होते अर्ज
बीड (रिपोर्टर): 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ही भरती काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती. भरती रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे पैसे देण्याची मागणी केलीजात होती. आता या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळणार आहे.
राज्य सरकारने जिल्हा परिषदेमधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च 2019 आणि ऑगस्ट 2019 मध्ये महाभरतीची घोषणा केली होती. याची प्रक्रिया सुरू होती. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. अर्जापोटी 33 कोटी 29 लाख 45 हजार 250 रुपये जि.प.कडे वर्ग झाले होते. मात्र काही कारणास्तव ही भरती प्रक्रिया रदद झाली होती. भरती रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली होती. सदरील विद्यार्थ्यांचे पैसे परत देणार असल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.