पिंपळनेर येथे घडली घटना
बीड (रिपोर्टर)- नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 55 वर्षीय शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपळनेर येथे घडली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच लोकांचे पैसे कसे द्यायचे या चिंतेतून राधाकिसन बाबूराव जाधव (वय 55 वर्षे रा. पिंपळनेर) या शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या सातत्याने होत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना आखण्याची मागणी केली जात आहे.