येत्या 27 तारखेला मुख्यमंत्री शिंदे बीड जिल्ह्यात
परळी येथे सरकार आपल्यादारी
बीड (रिपोर्टर)ः- खूप दिवसापासून लांबत पडलेला सरकार आपल्यादारी या कार्यक्रमाचे तारीख एकदाची फिक्स झाली असून हा कार्यक्रम 27 नोव्हेंबर रोजी परळी येथे होणार आहे. हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असून प्रशासनाच्यातवीने 22 एकरमध्ये वॉटरप्रुफ आणि वाताणुकुलीत मंडप उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील अनेक मंत्री गण उपस्थित राहणार असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत असून या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाच्या स्वरुपातील धनादेश, प्रमाणपत्रे वाटप करण्यात येेणार आहे.
सप्टेंबर महिन्यापासून या कार्यक्रमाचे तारीख, तारीख पे तारीख पुढे ढकलण्यात येत होती. एकदाची राज्य सरकारकडून या कार्यक्रमाला ग्रिन सिग्नल मिळाला असून येत्या 27 नोव्हेंबरला कार्यक्रम परळी येथे घेण्याचे निश्चीत झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनही कामाला लागलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्व विभागाच्या खाते प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंंडे यांनी आयोजीत केली होती. या बैठकीला जिल्हा परिषेदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पाठक सह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हाच्या विकासाच्या काही प्रकल्पांना मंजूरीची घोषणा ही मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात येणार असून त्या दुष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच संजय गांधी, श्रावण बाळ, विविध कामांच्या मंजुर्या, वैयक्तीक स्वरुपाच्या लाभाचे लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप ही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचातीचे ग्रामसेवक आणि सरपंचही उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात सर्व खातेप्रमुखांनी आपआपल्या विभागाचे काम घरचे काम आहे असे समजून कामाला लागावे अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्या आहे. ग्रामीण भागातील निवडलेल्या लाभार्थ्यांना परळी येथे ने आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.