बीड (रिपोर्टर): केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी मोटर वाहन कायदा अमलात आणला. हा कायदा चालकांसाठी जाचक असून या कायद्याच्या विरोधात देशभरातील चालकात संताप व्यक्त केला जात आहे. आज चालक-मालक संघटनेच्या वतीने कायदा रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता. आंदोलनकत्यार्र्ंनी हातात काळे झेंडे घेऊन मोर्चात सहभाग घेतला होता. ‘काला कानून मुडदाबाद, चालक ,कता झिंदाबाद’ यासह इतर घोषणांचे फलक आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये दिसून येत होते.
हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेत मोटार परिवाहना संदर्भात कायदा करण्यात आला. हा कायदां चालकांना त्रासदायक ठरणार आहे. कायदा रद्द करावा यासाठी देाभरातील चालकात संताप व्यक्त केला जात आहे. कायद्याच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनसुद्धा आहेत. आज बीड शहरातील चालक-मालक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता. या मोर्चात सर्वच चालक सहभागी झाले होते. ‘काला कानून वापस लो’, ‘चालक एकता झिंदाबाद’, ‘हिट अॅण्ड रन’ कायदा रद्द झालाच पाहिजे यासह इतर घोषणांचे फलक हातात घेऊन चालक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चाने अवघे शहर दणाणून गेले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे सादर केले.