दिंद्रुड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शेकडो वर्षांपासून रविवारी आठवडी बाजार भरतो.या निजामकालीन बाजाराच्या गट नंबर 731 मध्ये गावकरी व प्रशासन यांना अंधारात ठेऊन केलेला बेकायदेशीर फेरफार (नंबर 2127) रद्द करण्यासाठी दिंद्रुडकर आक्रमक झाले असून दिंद्रुड व पंचक्रोशीतील नागरिक उपोषणास बसले आहेत.
गेल्या शेकडो वर्षापासून दिंद्रुड येथील आठवडी बाजार प्रत्येक रविवारी भरतो बाजाराच्या दिवशी दिंद्रुड परिसरातील 30 ते 35 गावातील व्यापारी लोक, सर्वसामान्य लोक बाजारात येतात. हजारो लोकांच्या उपजीविकेची जागा असलेल्या या बाजारातळावर मागच्या काही वर्षापासून मुस्लिम समाजातील लोकांनी दफनविधी चालू करत त्यावर जाळी बसवण्यास चालू केले आहे. यामुळे छोट्या-मोठ्या व्यापार्यांना बाजारात बसण्यास जागा मिळत नसल्याकारणांनी परिसरातील अनेक छोट्या मोठ्या व्यापार्यांनी बाजारात येणे बंद केले आहे,भविष्यात हे असेच सुरू राहिले तर बाजारच बंद होतो की काय अशी भीती सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेकडो वर्षापासून सुरू असलेला हा बाजार टिकावा यासाठी दिंद्रुड व पंचक्रोशीतील लोकांनी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देत या बाजाराचा गट नंबर 731 मधील 21 27 हा अवैध्य फेर रद्द करण्याचे निवेदन दिले होते अन्यथा सोमवार रोजी अन्नत्याग व इच्छामरण उपोषण करू असे निवेदन दिले होते त्याच अनुषंगाने आज येथील शेकडो नागरिक जुने बस स्थानक या ठिकाणी उपोषणास बसले आहेत.उपोषणाची दखल घेत प्रभारी नायब तहसीलदार अमोल सवाईश्याम,मंडळ अधिकारी हांगे यांनी भेट देवून लोकांना उपोषणा पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हास लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.