शहरवासियांना पाणी मिळेना, न.प.चे पाणी पुरवठ्याबाबत नियोजन ढिसाळ
बीड, (रिपोर्टर)ः-शहरातील अनेक भागामध्ये 15 ते 20 दिवसाला पाणी येते. पाण्याच्या बाबतीत नगर पालिकेचे योग्य नियोजन नाही, काही ठिकाणी तर नागरीकांना इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागते. माजलगाव बॅक वॉटरच्या पाईपलाईनचे वॉल लिकेज झालेले आहे.त्यातुन हजारो लिटर पाणी वायाला जाते. आज सकाळी खंडेश्वरी परिसरात वॉल फुटल्याने त्यातुन अनेक लिटर पाणी वायाला गेले. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे अशा दुष्काळात जनता पाण्यासाठी त्रस्त असतांना पाईपलाईनच्या वॉलमधुन पाणी वायाला जात असल्याने नगर पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
न.प.चा पाणी पुरवठा विभाग नुसताच नावाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला.
सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामध्ये पाण्यासाठी नागरीकांचे हाल होवू लागले. शहर वासियांना वेळेवर पाणी मिळत नाही, 15 ते 20 दिवसाला पाणी येते. काही ठिकाणी एक महिन्याला पाणी येत आहे. नळाला पाणी येत नसल्याने बहुतांश शहर वासिय विकत पाणी घेवू लागले. एकीकडे नळाला पाणी येत नाही अन् दुसरीकडे मात्र माजलगाव बॅक वॉटरच्या पाईपलाईनमधील वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी वायाला जात आहे. आज सकाळी खंडेश्वरी परिसरातील वॉल फुटल्याने त्यातुन हजारो लिटर पाणी वायाला गेले. नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केले जात नाही. पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आपल्या कामात निष्क्रीय पणा करत असतात. नगर पालिका प्रशासनाचे अधिकारी देखिल पाणी पुरवठ्या बाबत गांभीर्य घेत नाहीत. जनता पाण्यासाठी त्रस्त असतांना वॉलमधून हजारो लिटर पाणी वायाला जात असल्याने न.प.च्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.