रिपोर्टर अपडेट
जातीचा पाईक ओळखे पाईक।
आदर तो एक त्याचे ठायी।
जगद्गुरू संत तुकाराम महरााज म्हणतात जो जातीचा पाईक असतो तो दुसर्या पाईकाला ओळखतो आणि त्याचा आदर करतो. त्याचा अनुभव आज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे च्या व्यासपीठावर आला. गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपला देह झिजवणारे मनोज जरांगे पाटील आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या समाजावर मातृत्वाची सावली धरणार्या पंकजा गोपीनाथ मुंडे योगायोगाने नारायणगडच्या नारळी सप्ताहा समारोपाच्या दरम्यान सिरसमार्ग या ठिकाणी एकत्रित पहायला मिळाले. या दोनही धिरोदत्तांनी धैर्य ठेवून संघर्ष करत यशाची पताका फडकावण्याचा गुरूमंत्रच आपल्या अनुयायांना दिला. इथे लहान मोठा, गरिब श्रीमंत , राजा आणि रंक कोणीच नाही. तर इथे सर्वसमान असल्याचे या दोघांनाही वेळोवेळी आपल्या भाषणातून सातत्याने सांगून सत्याची चाड आणि असत्याची चीड नेहमीच व्यकक्त केली. ते दोघे आज एका अध्यात्मिक व्यासपीठावर पाहायला मिळाले.
अवघ्या महाराष्ट्राला जसे पंकजा गोपीनाथ मुंडे यांची ओळख करून द्यायची गरज नाही. तसे उभ्या महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील यांची ओळख करून देण्याची नक्कीच गरज नाही. हे दोनही धिरोदत्त , संघर्षाची एक मिसाल आहेत. सत्यासाठी, न्यायासाठी आणि हक्कासाठी केव्हा, कुठे, कसे लढायचे हे दोघेच सांगू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणावर पंकजा मुंडेंचा जेवढा दबदबा आहे. तेवढाच महाराष्ट्राच्या समाजकारणावर मनोज जरांगे पाटील यांचा दबदबा दिसून आलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणं करत आपला देह अक्षरश: मृत्युच्या दारेत ठेवणारे जरांगे हे एका समाजाचे नेतृत्व करत असले तरी अन्य समाजाला सोबत घेऊन माणूस धर्म पाळत आहेत. पंकजा मुंडे कुठल्या एका जातीत जन्मल्या असल्या तरी अखंड मानवजात ही आपलीच मानत त्यांच्यासाठी त्या नेतृत्व करत आल्या आहेत. बीड जिल्ह्याचं पालकत्व करत असो अथवा मंत्रीपदाच्या रूपानं महाराष्ट्राचं नेतृत्व करत असो. तेव्हा ही पंकजा मुंडेंनी कुठली जात, पात, धर्म अथवा गोत्र नक्कीच पाहायला नाही. मुंडे-जरांगे यांच्या आजच्या या भेटीला एवढ्यासाठीच महत्व आहे 2024 ची लोकसभा निवडणूक सध्या चालू आहे. गेल्या वर्ष, दिड वर्षच्या कालखंडामध्ये मराठा समाज आरक्षणाबाबत सरकार विरोधात आक्रमक आहे. जो आमची मागणी मान्य करेल तो आमचा नेता असेल ही भूमिका जरांगे पाटलांची आहे. मात्र अशा स्थितीमध्ये विकासात्मक गाोष्टींना महत्व देत राजकीय प्रचार व्हायला हवा. तो न होता जाती पातीवर होत असल्याने ही भेट अनन्य साधारण म्हणावी लागेल. नारायणगडाचा नारळी सप्ताह हा सिरसमार्ग या ठिकाणी गेल्या सात दिवसांपासून सुरू आहे. आज त्या सप्ताहाची सांगता आहे. या सप्ताहाला भेट देण्यासाठी आणि साधू संतांच्या चरणी लिन होण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सिरसमार्ग या ठिकाणी आले होते. त्याचवेळी पंकजा मुंडे या त्या ठिकाणी आल्या. यावेळी आयोजकांनी जरांगे पाटील यांचे शेजारी पंकजा मुंडे त्यांना असनस्थ होण्याची विनंती केली. जरांगे पाटील आणि पंकजा यांच्यामध्ये तेवढ्या वेळात चर्चाही झाली. विषय हा आहे. जरांगे पाटलांनी मराठ्यांचे आंदोलन हाती घेतले आहे मात्र निवडणुकांमध्ये ना कोणाला पाठिंबा दिला, ना कोणाचा प्रचार केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही. मात्र निवडणुक कालखंडामध्ये नायक आणि खलनायक उभे करण्याचे काम काहींकडून होत आहे. कधी कोणी पंकजा मुंडेंना तर कोणी जरांगेंना पाण्यात पाहत आहे. मात्र हे दोघंही संघर्षाचे धिरोदत्त आहेत. धैर्य ठेवून संघर्ष करत यशाची पताका फडकावण्याचा गुरूमंत्र देणारे एक प्रकारे गुरू आहेत. या दोन व्यक्तींची भेट आज संतांच्या छायेत महत्वपूर्ण मानली जाते.