बीड (रिपोर्टर)ः- लोकशाही सदृढ करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, भारतीय लोकशाहीत माणसांची हक्क, कर्तव्य यांची जोपसण्याबरोबरच मानवी कल्याण करण्याचे कायदे कायदे मंडळात आपण लोकप्रतिनिधी निवडुण देत असतो. येत्या 13 मे बीड लोकसभेसाठी मतदान होत असून हे मतदान मतदारांचा हक्क असलेल्या सर्व मतदारांनी करावे असे प्रतिपादन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केले.
जिल्हा निवडणुक प्रशासनाच्यावतीने ीड लोकसभेत मोठ्या संख्येने मतदान व्हावे मतदानांची टक्केवारी वाढवावी यासाठी आज सकाळी सामाजिक न्याय भवन येथून सायकल मॅरेथॉन रॅली सकाळी काढण्यात आली. या रॅलीच्या समारोपा प्रसंगी दिपा मुधोळ मुंडे बोलत होत्या. यावेळी जिल्ह्याचे निवडणुक खर्च निरीक्षक बिस्वास, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, निवडणुक उपजिल्हाधिकारी महिंद्र कुमार कांबळे, तहसिलदार कुलकर्णी, नाय तहसिलदार हजारे, नगर परिषद मुख्याधिकारी निता अंधारे, डॉ.विक्रम सारुक यांच्यासह मोठ्या संख्येत अधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅलीची सुरूवात जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. ीड शहरातील सामाजिक न्याय भवन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक, माळीवेस, डॉ.बाबासाहे आंबेडकर यांचा पुतळा ते परत सामाजिक न्याय भवन येथे सायकल रॅलीचा समारोप झाला. बीड जिल्हयात 21 लाखाच्या पुढे मतदार असून 13 मे ला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन महाराष्ट्रात मताच्या टक्केवारीमध्ये जिल्हयाचे अव्वल स्थान असावे यासाठी प्रशासनच्यावतीने जाणीव जागृती करण्यात येत आहे. त्याच्यात एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये योगाग्रुप डाक्टर असासिएशन, शाळेतील काही मुले सहभागी झाले होते.