
म्हणाले, 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसह मी बीडहून रेल्वेने अहिल्यानगरला जाणार
तुमच्या सहकार्याने नवा विकसित बीड जिल्हा घडवायचाय -ना. अजित पवार
बीड (रिपोर्टर): आपल्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा आपण बदलणार आहोत. नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे. तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्यदिनी करू, असं म्हणत बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या युवकांना तंत्रज्ञान आधारीत कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रीपल आयटी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे. टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयडीसी यांच्या सहकार्याने जवळपास दोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी बीडहून रेल्वेने अहिल्यानगरला जाणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी भरपावसात केली.

ते बीड येथे ध्वजारोहणासाठी आले होते. त्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. भरपावसात अजितदादांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण केले अन् पावसातच त्यांनी उपस्थितांना संबोधले. या वेळी आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, माजी आ. उषताई दराडे, सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, प्रजासत्ताक झाला त्यावेळेचा काळ देशासाठी खूप कठीण काळ होता देशासमोर अनेक आव्हान होती परंतु गेली 79 वर्ष हे स्वातंत्र्य आपण टिकवलं आणि सुरक्षित केलं जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली त्याचा श्रेय हे आपल्या भारत देशातल्या जनतेला जनतेच्या लोकशाही वरच्या विश्वासाला आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेवर भारतीय राज्यघटनेवर प्रगाढ विश्वास दाखवलेला तमाम देशवासीयांना जातं मी त्यांचे मनापासून आभार मानतो .
मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची प्रज्ञावंतांची बुद्धिमत्तांची कलावंतांची कष्ट करायची भूमी आहे या भूमीला धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाड्याला सहजासहजी काही मिळाले नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 13 महिने दोन दिवसांनी म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामाच्या सैन्याची लढावं लागलं गावागावात आंदोलन करावी लागली रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्या वा लागला रक्त देखील सांडावे लागलं त्या त्यागाचा स्मरण करणे त्या करणार्या मुक्तिसंग्राम करणार वंदन आणि अभिवादन करणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पार पाडत आहोत..
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा आपण बदलणार आहोत नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचाय तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्यदिनी करू या बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चिती आणि व्यवहार पूर्ण व्यवहारता चाचणी साठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्याच्या युवकांना तर तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिपल आयटी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयडीसी यांच्या सहकार्यांनी जवळपास 200 कोटी रुपयांचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे त्याचाही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाची अडथळे दूर करण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रशासन सगळेजण बसतोय आणि हा प्रमुख मार्ग पूर्णत्वास देण्याचा आराखडात आला असून लवकरच यावर रेल्वे धावणारे परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित 351 कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बीड मधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतोय साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला 17 तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो त्यानिमित्ताने स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडावंदन करून मी इथे झेंडावंदन करीन नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्यानगरला पण त्या दिवशी सुरू करणार आहोत आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असे टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण दळणवळणाचा चांगल्या पद्धतीने व्यवस्था केल्याशिवाय खर्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा विकास हा होऊ शकत नाही आणि त्याकरता सर्व बाजूने आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत.
– आपल्या जिल्ह्यात महसूल भावनांच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच आपण केला गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या दौर्यावर असताना प्रत्येक विभागांचा विकास कामांचा सविस्तर आढावा आम्ही सर्वांनी बसून घेतला त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकी इमारतीची पाहणी करण्यात आली लवकरच अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभीमुख प्रशासनासाठी ही इमारत सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल .





