
ऑटो चालक लोखंडे बेपत्ता.
किल्ले धारूर (रिपोर्टर): धारूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे यात पुराच्या पाण्यात दोन व्यक्ती वाहून गेले आहेत यातील अडत व्यापारी नितीन शिवाजी कांबळे यांचा मृत्यू झाला आहे तर दुसरा रिक्षाचालक अनिल लोखंडे हा आणखीही बेपत्ता आहे.
धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील अडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे वय 42 वर्षे रुई धारूर हून अंजनडोह कडे चारचाकी वाहनातून येत असताना वान नदीवरील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नितीन कांबळे हे गाडीसह वाहून गेल्याचे गावकर्यांनी सांगितले……. तसेच धारूर – आवरगाव रस्त्यावरील आवरगाव येथील पूलावर धारूर तालुक्यातील गोपाळपूर अंतर्गत संभाजीनगर येथील ऑटो चालक लोखंडे ऑटोसह वाहून गेल्याची घटना घडल्याचे कळत आहे. यावेळी रुई धारूर ,अंजनडोहसह जवळच्या गावकर्यांनी शोधा शोध सुरू केला आहे . यात नितीन कांबळे यांचा मृतदेह सापडला असून अनिल लोखंडे यांचा आणखी शोध सुरू आहे. त्यांचा रिक्षा सापडला असून ते बेपत्ता आहेत. यावेळी धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे तहसील प्रशासनातील नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, उपनिरीक्षक बाबासाहेब भवर मंडळ अधिकारी कपिल गोडसे, सह महसूल -पोलीस अधिकारी कर्मचारी, उपसरपंच प्रकाश सोळंके, महेश सोळंके, तलाटी महादेव देशमुख ,पत्रकर अतूल शिनगारे पत्रकार ईश्वर खामकर सामाजिक कार्यकर्ते रमेश नखाते, ऋषी गव्हाणे, सोनू फुके सह नागरिक घटनास्थळी जाऊन शोध कार्यसाठी प्रयत्न केले
प्रशासनाचे आव्हान —
धारूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व शेतकर्यांनी नदी नाला ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोक्याची नाही याची खात्री करूनच पार करावा असे आवाहन किल्ले धारूर चे तहसीलदार श्रीकांत निळे, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, उपनिरीक्षक बाबासाहेब भवर सह महसूल – पोलीस प्रशासनाने केले आहे.









