गेवराई (रिपोर्टर) गेवराई शहरातील बायपास टू बायपास या मुख्य रस्त्याचे काम सुरू असून याबाबत अनेक तक्रारी होत असल्याने आ.लक्ष्मण पवार यांनी आज सकाळी संबधित सर्व अधिकारी, कंत्राटदार, संपादक गंमत भंडारी व पत्रकार बांधवांना सोबत घेत थेट काम सुरू असलेल्या ठिकाणी स्पॉट पाहणी करून संबधित अधिकारी व कंत्राटदार यांना ईस्टीमेट नुसार दर्जेदार काम झाले पाहिजे आशा कडक सूचना दिल्या.
गेल्या आनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या बायपास टू बायपास या मुख्य रस्त्याचा पाठपुरावा करून आ.लक्ष्मण पवार यांनी या कामाला मंजुरी मिळवून आणल्यानंतर गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अखेर या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून याबाबत काही तक्रारी नुसार वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध
झाल्यानंतर याची दखल घेत आ.लक्ष्मण पवार यांनी आज सकाळी 11 वा. संबधित अधिकारी कंत्राटदार व संपादक गंमत भंडारी यांच्यासह पत्रकार बांधवांना सोबत घेत थेट कामावर जाऊन स्पॉट पंचनामा केला व ज्या ठिकाणी खड्डे आढळून आले याबाबत पुन्हा त्या ठिकाणी सर्व काम व्यवस्थित झाले पाहिजे व यापुढे सर्व काम हे ईस्टीमेट नुसारच आणि दर्जेदार काम झाले पाहिजे आशा कडक सूचना देऊन यापुढे आपण वेळोवेळी या कामाची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी संपादक गंमत भंडारी, कार्यकारी अभियंता चव्हाण, उप कार्यकारी अभियंता भोरे, घोळवे, नॅशनल हायवेचे कसबे, सह अभियंता गोंडरे, शाखा अभियंता उत्तम कुलकर्णी, कंत्राटदार कुलदीप पांडे, राजेंद्र राक्षसभुवनकर, जे.डी. शहा, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, सचिव दिनकर शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.