बीड (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील टाकरवण येथील चारी क्र. 59 चे मायनर चारी ही गेवराई, तलवाडा, टाकरवण राज्य महामार्ग ते टाकरवण शिवारापर्यंत आहे. या चारीतील गाळ पाटबंधारे विभागाने काढून चारी लगतच्या रस्त्यावर टाकल्याने शेतकर्यांना शेतात येण्याजाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी मुरुम टाकावा या मागणीसाठी परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभाग बीड कार्यालयासमोर आज उपोषणाला बसले आहेत.