नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग पुर्णत्वास नेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. स्व. मुंडेंचं हे सर्वात मोठं स्वप्न होतं. ते आज साकार होताना आनंद होत आहे. न्यू आष्टी ते परळी ही रेल्वे आधीच चालू झाली असती मात्र मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांच्या कार्यप्रणालीमुळे विलंब झाल्याचे खा. मुंडेंनी म्हटले.
खा. प्रितम मुंडे पुढे म्हणाल्या की, माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण आज आठवलं, ते भाषणही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर केलं होतं. भाषण कसं करायचं, माहित नव्हतं. मुद्दे काय असतात हे माहित नव्हतं. तेव्हा मी म्हणाले होते, नगर-बीड-परळी रेल्वेचं स्वप्न मी साकार करणार, ते आज झालं. या रेल्वे मार्गासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी रेल्वेला 50 टक्के वाटा द्यायचा ठरवला. तेथूनच राज्य आणि केेंद्र सरकारच्या माध्यमातून हा रेल्वे मार्ग होत आहे. आज आष्टीवरून रेल्वे मुंबईला गेली पाहिजे, तेव्हा खरा आनंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत खा. प्रितम मुंडेंनी शेतकर्यांचा मावेजा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आणि रेल्वे आंदोलकांवरील गुन्हे पाठीमागे घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.