औरंगाबाद/बीड (रिपोर्टर) महाविकास आघाडीला प्रचंड प्रमाणात त्रास देण्याचे काम भाजपाने केले. हे सरकार पाडण्यासाठी काय काय केलं नाही. भय-भ्रष्टाचार निर्माण करणं एवढच भाजपाचं काम असून भाजपावाले ओबीसीविरोधी आहेत, असा घणाघाती आरोप करत काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत असून पदयात्रेला जनआंदोलनाचे स्वरुप येऊ लागले असल्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले हे बीडमध्ये येत असताना औरंगाबाद येथे प्रसिद्धी माध्यमाशी बोलत होते. पटोदे आज सकाळी भगवानगडावर दर्शनासाठी गेले. या वेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री अशोक पाटील, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देामुखसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते बीड शहरातील आयोजीत ओबीसी सेल मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, स्वार्थी राजकारण देशाला घातक ठरणारे आहे. आज रुपयाची किंमत कागदासमान झाली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोर्या वाजला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने काय काय नाही केले. असं म्हणत ते पुढे म्हणाले की, ओबीसींचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हे प्रश्न सोडवण्याचे काम राज्य आणि केंद्र सरकार करत नाही. भाजपावाले ओबीसीविरोधी आहे. ओबीसी समाज शेतीशी निगडीत आहे, शेतकर्यांच्या ज्या काही आत्महत्या होत आहेत त्यात ओबीसींचा जास्त समावेश असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले. लोकांचा कल आता बदलू लागलाय, भाजपाच्या विरोधात संताप निर्माण होत आहे. दुसर्याचे घर फोडणे हा एकमेव धंदा भाजपावाल्यांचा आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये पदयात्रा सुरू आहे. या पदयात्रेला जागोजागी प्रचंड प्रतिसाद मिळत असून पदयात्रेला जनआंदोलनाचे स्वरुप येऊ लागले. गावची गावे या यात्रेत सहभागी होऊ लागलेय. काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे. सर्व धर्मांना काँग्रेस पक्षाने न्याय देण्याचे काम आजपर्यंत केलेले आहे. असेही पटोले यांनी या वेळी सांगितले. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने शंभर दिवसात राज्याला काय दिले? इथले प्रकल्प गुजरातला देण्याचे काम या विद्यमान राज्य सरकारने केले असून प्रकल्प गुजरातला गेल्याने मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले.