बीड (रिपोर्टर) अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यापेक्षा थेट अनुदान जाहीर करावे, विम्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा या प्रमुख मागण्यांसाठी आज नांदुरघाट परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरला होता. महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. हे आंदोलन प्रा. सुशिला मोराळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात अनेक शेतकर्यांचा सहभाग होता.
अतिवृष्टीने शेती पिकाचं मोठं नुकसान होऊनही राज्य सरकारने मात्र अजून कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. शासनाने योग्य ते पावले उचलून विम्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि शेतकर्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज नांदूरघाट परिसरातील शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध नोंदविला. महामार्गावर आंदोलन झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. सदरील हे आंदोलन प्रा. सुशिलाताई मोराळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी बबन आंधळेंसह आदी शेतकर्यांची उपस्थिती होती. राज्य सरकारवर आता आमचा विश्वास राहिला नाही. राज्यपाल यांनीच काय जो निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रा. मोराळे यांनी केली.