बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून धुव्वाधार पाऊस पडत आहे. या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी बीडचे पालकमंत्री अतुल सावे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले आहेत. सकाळी पालकमंत्री माजलगाव शहरामध्ये आले असता भाई गंगाभीषण थावरे यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवून शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये तात्काळ देण्याची मागणी केली.
परतीच्या पावसाने शेती पिकाचं मोठं नुकसान केलं. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांचे माजलगाव शहरामध्ये आगमन झाले. या वेळी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवून शेतकर्यांना तात्काळ एकरी 25 हजार रुपये देण्यात यावे, ज्या मंडळाचा 25 टक्के अग्रीममध्ये समावेश करण्यात आला नाही त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली.