शेवगा, सिताफळ, चंदनसह आदी फळबाग
बीड (रिपोर्टर) शेतकर्यांचा आर्थिकस्तर उंचवावा यासाठी केेंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जात असतात. नरेगा अंतर्गत फळबाग लागवड केली जाते. या लागवडीचा शेतकर्यांना दुहेरी फायदा होतो. नरेगातून मजुरांना पैसेही मिळतात आणि फळबागातून शेतकर्यांना उत्पन्नही मिळते. बीड तालुक्यातील 83 गावांमध्ये विविध फळबागांची लागवड करण्यात आली. सदरील ही लागवड गटविकास अधिकारी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
बीड जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळी पिके घेऊन आपला आर्थिकस्तर उंचावू लागले. नरेगातून फळबाग लागवड केली जाऊ लागल्याने यामुळे दुहेरी फायदा होऊ लागला. मजुरांना रोजगार मिळू लागला आणि फळबागातून शेतकर्यांना चांगला फायदाही होऊ लागला. बीड तालुक्यात 83 ग्रा.पं. अंतर्गत शेतकर्यांनी शेवगा, सिताफळ, चंदनसह आदी फळबागांची लागवड केली. सदरील ही लागवड गटविकास अधिकारी सानप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे चांगला पाऊस पडत असल्याने बीड जिल्ह्यात फळबागाचे क्षेत्र वाढले आहे.