जनतेची अडवणूक करता कामा नये
गटविकास अधिकार्यांचे कर्मचार्यांना निर्देश
बीड (रिपोर्टर) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांनी आज ग्रामसेवकासह ग्रामरोजगार सेवकांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी कर्मचार्यांना काही निर्देशन दिले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकर्यांची कसल्याही प्रकारची अडवणूक होता कामा नये त्याचबरोबर बोगस कामे होऊ नये याची काळजी कर्मचार्यांनी घ्यावी, असे निर्देशित करण्यात आले आहे.
आज पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी कर्मचार्यांची बैठक बोलवली होती. जॉब कार्डशी आधार कार्ड लिंक प्रकरणी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये कर्मचार्यांना त्यांनी काही निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्यांची अडवणूक होता कामा नये, रोहयोची कामे व्यवस्थीत झाली पाहिजे. रोहयोमधील गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, अशा सूचनाही त्यांनी कर्मचार्यांना दिल्या आहेत. या बैठकीला सर्व कर्मचार्यांची उपस्थिती होती.