बीड (रिपोर्टर) आजपासून बारावीच्या परीक्षा बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या असून या परीक्षा पोलीस बंदोबस्तात होत असून महसूल अधिकारी-कर्मचार्यांच्या बैठे पथकाच्या निगराणीत होत आहेत. त्यामुळे या परीक्षा सुरळीतपणे सुरू असून जिल्ह्यात 101 परीक्षा केंद्रांवर 34 हजार परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. दुपारपर्यंत कोणताही अनुचीत प्रकार आढळून आला नव्हता.
बारावीचा आज इंग्रजीचा पहिला पेपर सुरू झाला असून शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी बीड तालुक्यातील नेकनूर, येळंबघाट, दहिफळ वडमाऊली, सारणी येथील परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. तर उपशिक्षणाधिकारी हजारे आणि काकडे यांनी रायमोहा, शिरूर आणि खालापुरी येथील बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार किंवा कारवाई झाल्याचे निदर्शनास आले नाही. पहिल्यांदाच या परीक्षा महसूल अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महसूल विभागाचे कर्मचारी, गटशिक्षण विभागाचे कर्मचारी गटविकास अधिकारी यांचे कर्मचारी अशा तीन विभागाचे संयुक्त बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश केेंद्र सोडण्यापुर्वीच परीक्षा केेंद्राची तपासणी केली जाते. शिक्षण विभाग आणि महसूलच्या पथकामध्ये महिला कर्मचार्यांचाही समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्तही आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास नोंदणी केलेले सर्वच परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला उपस्थित आहेत. या परीक्षा आजपासून 22 मार्चपर्यंत चालणार आहेत.
गेवराई तालुक्यातील 8 केन्द्रावर
12 वी च्या परीक्षेला शांततेत सुरूवात
गेवराई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेला, मंगळवार दि. 21 रोजी सकाळी अकरा वाजता शांततेत सुरूवात झाली असून, गेवराई तालुक्यातील 8 केन्द्रावर 4 हजार सात विद्यार्थ्यी परीक्षा देत आहेत. यंदा 14 लाख 57 हजार 2 9 3 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी सर्वाधिक नोंदणी केल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोचणे आवश्यक असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. राज्य मंडळातर्फे 21 फेब्रुवारी 11 ज ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होत आहे. राज्यातील दहा हजार 388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून तीन हजार 1 9 5 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यात सात लाख 9 2 हजार 780 विद्यार्थी आणि सहा लाख 64 हजार 441 विद्यार्थिनी आहेत. यंदा सहा हजार 516 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच 72 तृतीयपंथी विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.