हरभर्याची गंज पेटवली
दोन लाखाचे नुकसान
बीड (रिपोर्टर) हरभरा काढून त्याची गंज करून ठेवली असता दोघा जणांनी संगनमत करून त्या गंजीला आग लावल्याची घटना काल बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पट्टीवडगाव शिवारात घडली. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बळीराम वैजिनाथ पितळे या शेतकर्याने मोठ्या कष्टाने हरभरा पिकवला होता. तो काढून शेतात गंज करून ठेवली होती. काल रात्री विष्णू वैजिनाथ पितळे (रा. पट्टीवडगाव) व बाळू सुधीर केंद्रे (रा. फावडेवाडी जि. लातूर) यांनी गंजीला आग लावून दिली. याची माहिती बळीराम पितळे यांना मिळताच त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत संपुर्ण हरभरा जळून खाक झाला. या प्रकरणी बर्दापूर पोलीसात विष्णू पितळे आणि बाळू केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.