बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती ज्ञात असल्यामुळे जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक आराखडा आणि नियोजन करण्यात येत आहे. शेतकरी हे पारंपारिक पीक पद्धतीतून भरवश्याचे उत्पन्न मिळेल अशा पीक पद्धतीकडे शेतकर्यांनी वळावे यासाठी हे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी नेकनूर, शिरूर, गेवराई या ठिकाणी भेटी दिल्या.
बीड जिल्ह्यज्ञाच्या नूतन जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ यांनी 20 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. पदभार घेताच त्यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दौरे काढले. बीड जिल्ह्यामध्ये तूती लागवडीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. तुतीपासून शेतकर्यांना हक्काचे भरघोस उत्पन्न मिळू शकते. पूर्वी शेतकर्यांना तूतीपासून उत्पादन होणार्या कोषाची विक्री ही कर्नाटक आणि हैद्राबादला जावून करावी लागत असे, मात्र त्याचीच विक्री आता बीड तालुक्यातील नेकनूर या ठिकाणी होत असून या ठिकाणी कोषापासून रेशीम धागा तयार करण्यात येतो. त्यामुळे शेतकर्यांना तुतीचे मार्केट बीड जिल्ह्यातच तयार होत आहे. सोबतच बीड जिल्ह्यात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असून धारूर तालुक्यामध्ये सिताफळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, मात्र या सिताफळापासून बल्क तयार करून हा बल्क मुंबई, पुणेच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो, त्यामुळे सिताफळ लागवड करण्यासाठी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकर्यांकडे चारपैशांचे नगदी उत्पन्न हातात येईल. रोजगार हमी योजना आणि कृषी विभाग यांच्याकडील शेतकर्यांसाठी असलेल्या योजनांची पुर्णपणे अंमलबजावणी करण्याकडेही आपला कल असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सांगितले.