बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षतोडीवर कठोर कायदा नाही. झाड तोडणार्याविरोधात अद्यापही कठोर कारवाई झाल्याचे ऐकीवात आले नाही. भविष्यात वनराई राखण्यासाठी झाड तोडण्याच्या बाबतीत कठोर कारवाई करण्याकरिता कायदा करावा, अशी मागणी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे.
सयाजी शिंदे हे बीड येथे आले असता त्यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. शिंदे यांचा ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट येत आहे यासंदर्भात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. पुढे शिंदे म्हणाले की, वनराई राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. झाड तोडण्याबाबत कठोर कारवाई केली जात नाही. देवराई परिसरात जी झाडे आहेत त्या झाडांची देखभाल करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. वनविभागाने याकडे लक्ष द्यायला हवे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.