वीज पडून दोन दिवसात पाच जणांचा मृत्यू लहान-मोठे 13 जनावरे दगावले
बीड (रिपोर्टर) काल बीड जिल्ह्यातल्या विविध भागात वादळी वार्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी फळाबगा अक्षरश: भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यात वीज पडून ठिकठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला तर लहान-मोठे असे तेरा जनावरे दगावले. एप्रिल महिन्यातला हा वादळी वार्यासह तिसरा पाऊस आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्याने या पावसाने सर्वात जास्त शेतकर्यांचं नुकसान झालं. काल बीड तालुक्यासह अन्य तालुक्याच्या ठिकाणी पाऊस पडला. पावसामध्ये आडोश्याला थांबलेल्या या पाच व्यक्तींच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. यात लहान मोठे तेरा जनावरे दगावले. बीड तालुक्यातील कामखेडा येथील अंगद भागवत मस्के या शतेकर्याने दोनएकर शेतात पपईचा बाग लावला होता. वार्याने बाग पुर्णत: भुईसपाट झाला आहे. शासनाने तात्काळ शेतकर्यास योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू गायके यांनी केली आहे. दरम्यान बीड तालुक्यातील सौंदाना, कामखेडा, उमरद, खापर पांगरी, पारगाव सिरस, सोनगाव, दिमाखवाडी, नामलगाव, घोसापुरी यासह आदी ठिकाणच्या शेतकर्यांचे कालच्या पावसाने नुकसान झाले.