गेवराई (रिपोर्टर) गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन जनावरांच्या छावण्या सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेवराई तहसीलवर शेतकर्यांचा विराट जनआक्रोशी मोर्चा धडकला.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचायत समिती कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक ते मिरवणूक मार्गे तहसील कार्यालयावर शेतकर्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मोर्चात गेवराई विधानसभा मतदारसंघात पाऊस न झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ गेवराई मतदारसंघ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकर्यांचे लाईट बिल माफ करून किमान 12 तास सुरळीत विद्युत पुरवठा करावा. पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकर्यांना द्यावी, शेतकर्यांच्या पिकाला योग्य भाव द्यावा, यासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करून ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरली आहे त्यांनाही परत देण्यात यावी आदी मागण्या घेऊन हा विराट मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या शेतकरी बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सर्व मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या मोर्चाला बदामराव पंडित यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, युवा नेते युध्दाजित पंडित, रोहित पंडित, अभिराजे पंडित, नितीन धांडे, परमेश्वर सातपुते, तालुकाप्रमुख कालिदास नवले, पंढरीनाथ लगड, भीष्माचार्य दाभाडे, बबलू खराडे, मुकुंद बाबर, अमोल करांडे, धर्मराज आहेर, किरण आहेर, सय्यद सिराज, शेख शाहेदाद यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बदामराव पंडित हे शेतकर्यांचे नेते -अनिल जगताप
एकीकडे राज्यभरात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना तिकडे सत्तेसाठी रात्रंदिवस वाटाघाटी करणार्या या तिरडी सरकारला शेतकर्यांच घेणं देणं नाही. आज शेतकर्यांसमोर मोठं संकट उभा राहीले असताना हे दहीहंडी सारख्या मोहोत्सवात नाचगाने बघत फिरत आहेत. परंतु लोकनेते बदामराव पंडित हे एकमेव नेते आहेत ज्यांनी शेतकर्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढून शेतकर्यांचे अश्रू पुसण्याचं काम करत आहेत. तुम्ही कधीही हाक द्या, आबा कायम तुमच्यासाठी कायम तत्पर असतील म्हणून येणार्या निवडणुकीत तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने बदामराव पंडित यांच्या पाठीशी उभे राहावे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
येणार्या निवडणुकीत तुम्ही लोकनेते बदामराव पंडित हेच आमदार होतील आणि आपले महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येईल आणि याच मंत्री मंडळात आपले नेते बदामरावजी पंडित हे लवकरच मंत्री होतील असेही यावेळी बोलताना अनिलदादा जगताप यांनी सांगितले .
केव्हाही आवाज द्या, मी तुमच्यासाठी तत्पर -बदामराव
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे मात्र स्थानिक सत्ताधारी नेत्यांना आणि सरकार याचे काहीच घेणेदेणे नाही. या सरकारमध्ये सामील झाले सर्व गट मंत्री हे प्रत्येकजण आपली खुर्ची राखण्यासाठी झटत आहेत. मात्र ज्या मतदारांनी यांना निवडून दिले त्यांच्या प्रश्नासाठी भांडायला त्यांना वेळ नाही. मात्र मी आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करा नसता येणार्या निवडणुकीत राज्यातील जनता तुम्हाला तूंचि जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मइ सत्तेत असो व नसो मी कायम शेतकर्यांच्या प्रश्नासाठी लढत राहील. म्हणून तालुक्यातील जनतेने मला तुमच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी आवाज द्या मी तुमच्यासाठी कायम तत्पर राहील असे बदामराव पंडित यांनी या मोर्चाला संबोधित करताना सांगितले.