किल्ले धारूर( रिपोर्टर) धारूर तालुक्यातील विविध शेतकर्यांच्या मागणीसाठी आमदार प्रकाश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली 17 फेब्रुवारी शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करून विविध मागण्या राज्यकर्त्यांनी मान्य करून शेतकर्याला न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन रास्ता रोको ठिकाणी तहसील प्रशासनाला देण्यात आले यावेळी माजी सभापती जयसिंग सोळुंके माजी नगराध्यक्ष माधव तात्या निर्मळ, सुधीर शिनगारे ,तालुकाध्यक्ष अमोल (पान 7 वर)
जगताप, नितीन शिनगारे, परमेश्वर शिनगारे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
धारुर तालुक्यातील शेतकर्यांच्या विविध मागण्या संदर्भात 17 फेब्रुवारी शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक किल्ले धारूर येथे सकाळी 11.00 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रास्ता रोको आंदोलनासाठी आलेले माजी सभापती जयसिंग सोळंके माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ तालुकाध्यक्ष अमोल जगताप माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ ऍड परमेश्वर शिनगारे, परमेश्वर तिडके,आदी मान्यवरांनी राज्यकर्ते शेतकर्यांना विचित्रत आहेत याविषयी आक्रमक होत राज्यकर्त्यांनी शेतकर्याला न्याय द्यावा व या खालील मागण्या मान्य करावे यामध्ये शेतकन्यांच्या सोयाबीन पिकास प्रति क्विटल 10 हजार रू. भाव देवून खरेदी करावी,शेतकन्यांच्या कापूस विकास प्रति क्विटल 12 हजार रू. भाव देवून खरेदी करावी, शेतकर्यांच्या शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, शेतकर्यांच्या बँक खाते होल्ड केलेले सुरु करावीत
,अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकन्यांचे अनुदान त्वरीत बैंक खात्यात जमा करावीत, शेतकयांचे प्रोत्साहन अनुदान 50 हजार रु. बैंक खात्यात जमा करावीत,शेतकन्यांची दोन लाखाच्या पुढील थकीत रक्कमेची कर्ज माफी देण्यात यावी,एपीएल कार्ड धारक शेतकर्यांचे बंद केलेली धान्य पुर्वरत सुरु करावे, या मागण्या राज्यकतने विचारात घेऊन तत्काळ मागणी कराव्यात असे निवेदन रास्ता रोको ठिकाणी तहसील प्रशासना देण्यात आले यावेळी रस्ता रोको आंदोलनामध्ये धारूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते