बीड (रिपोर्टर): देशामध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने इथेनॉल बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा आहे. शेतकर्यांवर अन्याय करणारा आहे. शासनाने आपल्या निर्णयात बदल करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.
देशामध्ये साखरेचे उत्पादन घटले. त्यामुळे कारखानदारांच्या इथेनॉल उत्पादनावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी कारखानदारांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले, आता मात्र इथेनॉल बंद करून शेतकर्यांचेही नुकसान करण्याचे काम शासन करत आहे. इथेनॉल बंद केल्यामुळे कारखानदार शेतकर्यांना उसाला कमी भाव देऊ शकतात. शासनाने आपल्या निर्णयात बदल करावा आणि इथेनॉलचे उत्पादन सुरुच ठेवावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.