बीड (रिपोर्टर): बीड शहरातील अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य असून याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मोमीनपुरा येथील नालीचे पाणी चक्क रस्त्यावरून वाहत असल्यामुळे येणार्या-जाणार्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. न.प.कडे अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन मात्र कुठलीही भूमिका घेत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.
बीड शहरातल्या पांगरी रोड, जालना रोडचा काही भाग, भाजी मंडई यासह अन्य भागांमध्ये नाल्या तुंबून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. काही ठिकाणी कचर्याचे ढिग पडलेले आहेत, ते वेळेवर उचलले जात नाहीत, अस्वच्छतेमुळे रोगराईला आमंत्रण मिळू लागलेय. शहरातील मोमीनपुरा भागाती नाल्या वेळेवर काढल्या जात नसल्याने नाल्या तुंबून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. याचा त्रास येणार्या जाणार्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. मोमीनपुरा परिसरातील घाणीचे साम्राज्य आणि तुंबलेल्या नाल्या पाहता नागरिकात नगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागलाय. या भागातील स्वच्छता वेळेवर करण्याची मागणी करण्यात येत आहे.