बीड (रिपोर्टर): बीड शहरातील मोमीनपुरा भागामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शादीयाँ इज्तेमा कमिटीच्या वतीने सामूहिक निकाहचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आज साकळी 102 जोडप्यांचे निकाह पार पडले. या जोडप्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शादीयाँ कमिटीत अत्यंत चोख नियोजन होते. येणार्या सर्व पाहुण्यांना कमिटीच्या वतीने जेवणाची देखील व्यवस्था केली होती. या सामुहिक निकाहाला शेकडो नागरीकांची उपस्थिती होती. हे निकाहमध्ये बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील वधू-वरांनी नोंदणी केली होती. सामूहिक दुवाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मोमीनपुरा येथील शादीयाँ कमिटीच्या वतीने दरवर्षी सामूहिक निकाहचे आयोजन केले जाते. आज या कमिटीच्या वतीने 102 जोडप्यांचे निकाह पार पडले. यामध्ये बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील वधू-वरांनी आपले नाव नोंदवले होते. निकाह समारंभ मोमीनपुरा परिसरातील इज्तेमा मैदानात पार पडला. वधू-वरांना शुभआशिर्वाद देण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री सुरेश नवले, माजी मंत्री अर्जुन खोतकर आ. संदीप क्षीरसागर, ज्योतीताई मेटे, ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, माजी आ. राजेंद्र जगताप, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सिराज देशमुख, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, लोकाशाचे संपादक विजयराज बंब, सलीम जहाँगीर, मोईन मास्टर, वक्फ बोर्डाचे समीर काझी, कुंडलिक खांडे, परमेश्वर सातपुते, बळीराम गवते, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, बाळासाहेब अंबुरे, डॉ. साबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कमिटीचे अध्यक्ष अब्दुल बारी यांनी प्रास्तावीक केले. या निकाहसाठी अब्दुल खालेक, मुदस्सीर शेख, अब्दुल जमील, मोमीन कलीम, फारुक पटेल, मोईन मास्टर, अशफाक इनामदार, शाफे मेडिकलवाले, हाजी जमीर, खुर्शीद आलम, रझी सर सह आदींचे मोठे योगदान राहिले आहे. कमिटीने अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून हा सोहळा पार पाडला. वधू-वरांना शुभआशिर्वाद देण्यासाठी अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हुंडा घेऊ नका, सामंजस्याने वागा -मुफ्ती आरेफ
अत्यंत साध्या पद्धतीने लग्नकार्य करा जेणेकरून विनाकारण खर्च होणार नाही, आज साध्या पद्धतीने लग्न करणे गरजेचे झाले आहे. वधूकडील मंडळीकडे पैसे नसतात त्यामुळे त्यांच्या घरातील मुलींचे लग्न होणे गरजेचे आहे त्या दृष्टीकोनातून आजचा हा सामूहिक विवाह सोहळा आयोजीत केला आहे. यात 102 लग्न होत आहेत हे अत्यंत चांगले आहे. या विवाहसाठ ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे कौतुक करायला हवे, असे सांगत समाजामध्ये शांतती अणि अमन ठेवा, असं सामूहिक दुवाच्या माध्यमातून मुफ्ती आरेफ यांनी सांगितले.