बीड (रिपोर्टर): मराठवाड्यामध्ये यंदा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने धरणात पाण्याचा साठा काही टक्केच शिल्लक राहिल्याने आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. मराठवाड्यातील अकरा प्रकल्पात 47.89 टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या धरणात 9 तर मांजरामध्ये फक्त 20 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेलाआहे. राज्य सरकारच्या वतीने पाणीटंचाईबाबत आराखडा तयार करण्यात आला असून अनेक गावात टँकरची मागणी होऊ लागलीय.
मराठवाड्यातील मोठ्या 11 प्रकल्पात 47.89 टक्के पाणीसाठा आहे. 75 मध्यम प्रकल्पात 24 टक्के आणि 749 लघू प्रकल्पात 25.63 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवील 15 बंधार्यात 50.94 टक्के अणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 27 बंधार्यात 41 टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण 877 प्रकल्पात 40. 80 टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची मागणी वाढू लागल्याने पाणी टंचाई जाणवू लागली. रब्बी पिकांचे अवर्तन आणि बाष्पीभवनामळे फेब्रुवारीनंतर मराठवाड्यात पाण्याची टंचाई भीषण प्रमाणात जाणवणार आहे. जायकवाडी प्रकल्पात 43 टक्के पाण्याचा साठा आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव 9 आणि मांजरा धरणात 20 टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातल्या काही भागातून पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. यापूर्वी काही विहीरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. कमी पाऊस पडल्याने यंदा मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे दिसून येत आहे.