बीड, (रिपोर्टर)ः- बीड (रिपोर्टर): दुग्ध व्यवसायासाठी ओबीसी महामंडळाकडे कर्जाचा प्रस्ताव दाखल करून महामंडळाच्या अटीनुसार दोन जामीनदार देऊन तब्बल 75 हजार रुपयांचे कर्ज उचलले. मात्र फेडीदरम्यान कर्जदाराकडून चालढकल होऊ लागल्याने ओबीसी महामंडळाने जामीनदाराकडे वसुलीचा तगादा लावला असता बीडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात असलेल्या जामीनदारांनी महामंडळाकडे जामीनदार म्हणून दिलेले सरकारी नोकरदार आपल्याकडे नोकरीच करत नसल्याचे लेखी कळवले. त्यामुळे महामंडळाच्या सुमारे 1 लाख 9 हजार 314 रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महामंडळाचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून लोहार गल्लीतील सचीन चोथे सह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले अनिल काळे व विजय गायकवाड यांच्या विरोधात कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या लोहार गल्लीतील सचिव रामदास चोधे यांनी 2009 मध्ये दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ओबीसी महामंडळाकडे 75 हजार रूपये कर्जाची मागणी केली. महामंडळानेही कर्ज देतांना कर्जदारांने जर कर्जाची परतफेड केली नाही तर त्यासाठी आवश्यक असलेले दोन सरकारी नौकर जामीनदार द्यावे लागतील अशी अट घालण्यात आली. याअटीनुसार सचिन चोधे यांनी अनिल सुर्यभान काळे, विजय शामराव गायकवाड हे दोन सरकारी नौकर आहेत आणि ते बीड येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात शासकीय नौकरीला आहेत त्याअनुषंगाने कर्जदाराने जर कर्जाची परतफेड केली नाही तर ती परतफेड सरकारी नौकर या नात्याने आमच्या पगारातून करण्यात यावी असे हमीपत्रही दिले. 2009 ते 2018 या कालावधीपर्यंत कर्जदार सचिन चोधे यांनी कर्जाची परतफेड केली नाही आणि जामीनदार ही कर्जफेडीसाठी प्रतिसाद देत नाहीत. यामुळे 2018 साली ओबीसी महामंडळाने जिल्हा न्यायालयात कर्ज प्रकरणाच्या वसुलीसाठी रितसर केस दाखल केली. त्याअनुषंगाने 20 डिसेंबर रोजी या प्रकरणामध्ये न्यायालयाने निकाल दिल्याच्या अनुषंगाने कर्जदार सचिन रामदास चोधे बनावट सरकारी जामीनदार अनिल सुर्यभान काळे आणि विजय शामराव गायकवाड या तिघांवर ओबीसी महामंडळ जिल्हा व्यवस्थापक सोन्याबापु रावसाहेब गुट्टे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यातमध्ये वरील तिन्ही आरोपी विरोधात भादंवी कलम 420, 465, 466, 467, 468, 471,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा तपास पो.उप.नि. जाधव हे करीत आहेत.