बीड जिल्ह्यातील 14 विहीरींचे अधिग्रहन
बीड, (रिपोर्टर)ः- राज्यामध्ये यावर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मराठवाडयातली परिस्थिती बिकट आहे. जानेवारी, फेब्रुवारीपासुनच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू लागल्या. विहीर, बोअर, हापशाचे पाणी कमी झाले. बोटावर मोजण्या इतक्या तलावात 20 ते 25 टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला. मराठवाड्यात 250 पेक्षा जास्त टॅकरने पाण्याचा पुरवठा केला जावू लागला. बीड जिल्ह्यातील एक गाव आणि तिन वाड्यांना टॅकरने पाणी पुरवठा केला जात असुन पाण्यासाठी 14 विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या. फेब्रुवारी पासुन आणखी टंचाईच्या झळा जास्त जाणवणार आहेत.
यावर्षी मराठवाड्यासह राज्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. कमी पावसामुळे खरीब पिकासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. पाऊस चांगला पडल्यानसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. राज्यातील तलावात 25 ते 30 टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला. विहीर बोअर, हापशाचे पाणी कमी झाले. रब्बी पिकाचा पेरा अत्यंत कमी झाल्याने ज्वारी, गहू या पिकाचे उत्पादन अर्ध्यापेक्षा जास्तीने घटनार आहे.ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मराठवाड्यात 250 पेक्षा जास्त टॅकर द्वारे पाण्याचा पुरवठा केला जावू लागला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 117 गावांना 144 टॅकरने पाणी पुरवठा होत आहे. जालना जिल्ह्यातल्या 58 गावांना 110 टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर बीड जिल्ह्यातील एक गावाला व तीन वाड्याला 1 टॅकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जावू लागला. जानेवारी समाप्तीची ही परिस्थिती असली तरी आगामी कार्यकाळात पाणी प्रश्नाची समस्या गंभीर जाणवणार आहे. जुन, जुलै पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे आवाहन प्रशासना समोर राहणार आहे. पाण्यासाठी विहीरी बोअर सुध्दा अधिग्रहीत केले जातात. जिल्ह्यातील 14 विहीरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.