बीड, (रिपोर्टर)ः- विरोधी पक्षाचा अद्याप उमेदवार घोषीत झाला नाही. माझा एक प्रचार दौरा संपूण जिल्ह्यात दुसरा प्रचार दौरा सुरू आहे. बीड जिल्ह्यातली जनता ही सुजान आहे. तिला विकासाची गरज आहे. बीड जिल्ह्यात आज पर्यंत सर्वात जास्त निधी मी आणला आहे आणि या पुढेही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटीबध्द असल्याचे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी म्हंटले.
त्या सायं.दै.बीड रिपोर्टर कार्यालयास सदिच्छ भेट देण्यासाठी रिपोर्टर भवन येथे आल्या होत्या. त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, संतोष राख, मुन्ना फड, यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी सायं.दै.बीड रिपोर्टचे संपादक शेख तय्यब, कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी त्यांचा सत्कार केला. पंकजा मुंडे यांनी संपादक शेख तय्यब यांच्यासोबत बीड जिल्ह्याच्या राजकारणा बरोबर राज्याच्या राजकारणावर प्रदिर्घ चर्चा केली. गेल्या 26 वर्षाच्या कालखंडात ज्या काही लोकसभा अन् विधानसभा निवडणूका झाल्या त्या निवडणूकांच्या निकालापासुन जिल्ह्याच्या जातीय समीकरणाबरोबर चर्चा होत विकासाच्या राजकारणाला आपण प्राधान्य देत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हंटले. बीड जिल्हा हा सुसंस्कृत आणि विकासाची जान असलेला जिल्हा आहे. आपल्या सत्ता केंद्रामध्ये जास्तीत जास्त निधी बीड जिल्ह्यात आणल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगून विकासाचा दृष्टीकोन हीच आपली जात असल्याचेही पंकजा मुंडे यांनी या चर्चे दरम्यान म्हंटले. जिल्ह्याच्या काही महत्वाच्या कामावर भाष्य करत आपला विजय नक्की असल्याचे सांगून अद्यापर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाला उमेदवारही घोषीत करता आला नाही. आपला एक प्रचार दौरा संपूण दुसरा प्रचार दौरा सुरू असल्याचे त्यांनी म्हंटले. मी कुठलीही निवडणूक सोपी समजत नाही. तशीही निवडणूकही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आणि गंभीरतेणे घेणारी आहे. फरक एवढाच आहे माझा विकासाची जाण असलेल्या जनतेवर पुर्ण विश्वास असल्याचेही पंकजा मुंडेंनी यावेळी म्हंटले.