धानोरा येथे बजरंग सोनवणे यांचे जंगी स्वागत, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
आष्टी (रिपोर्टर):- मागिल निवडणुकीत जनतेने ऐवढे मत दिले 5 लाख 9 हजार मत मला दिले त्याचाच भाग म्हणून त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी निवडणूक लढत आहे.बीड जिल्ह्यात मागिल 10 ते 15 वर्षापासून भाजपचा खासदार असल्याने मीच काय जनता पण समाधानी नाही बीड जिल्ह्यातील प्रत्येक जनतेला खासदाराचा बदल हवाय मागील निवडणुकीत सर्व नेते बरोबर होते म्हणून माझा पराभव झाला पण आता जनता बरोबर असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा दावा बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला ते लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्हा त आगमन झाले धानोरा येथे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले
बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे पहिल्यांदाच आज सकाळी बीड जिल्ह्यात दाखल झाले धानोरा सह ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यातील जनतेचे सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे जनताच निवडणूक हाती घेऊन मला निवडून देणार आहे यात कसली शंका नाही सर्वसामान जनता माझ्याबरोबर असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,मेहबूब शेख,राम खाडे,किशोर हंबर्डे, परमेश्वर शेळके,सुनील नाथ, दिपक खिळे आदींसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.