माजलगाव (रिपोर्टर) केंद्र सरकारने तीन कृषी काळे कायदे वापस घेतल्यानंतर शेतकर्यांना हमीभाव व केंद्रीय समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले नाही म्हणून दि ३१ जुलै रोजी देशव्यापी विश्वासघात दिवस म्हणून आंदोलनाची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने देशभरात दिली होती यायचं एक भाग म्हणून तेलगाव माजलगाव महामार्गावर नित्रुड येथे किसान सभेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले
प्रसंगी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी केली..या खरीप हंगामात सातत्याने लागून राहिलेल्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी, एम.एस.पी.ची केवळ घोषणा नको उत्पादन आधारित दीडपट हमीभावचा कायदा करा,संयुक्त किसान मोर्चाच्या किसान आंदोलनात शेतकर्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्या, रासायनिक खतांची किमती कमी करून काळा बाजार थांबवा, प्रलंबित २०२०,२१,चा पीक विमा वाटप करा,जिल्हा मध्यवर्ती बँक नित्रुड, राजेवाडी, सादोळा या ठिकाणचे नवीन पीक कर्ज वाटप करा,शेती उपयोगी सर्व साहित्य जी.एस.टी कक्षेतुन वगळून ते अनुदानवर मुबलक प्रमाणात शेतकर्यांना वाटप
करावा इत्यादी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आहेत. प्रसंगी किसान सभेचे नेते नित्रुडचे सरपंच कॉ दत्ता डाके, कॉ सुभाष डाके,कॉ संदीपान तेलगड, ऍड. अशोक डाके,विकास डाके,सुखदेव घुले,माणिक काळे, परवेज सय्यद,पांडुरंग उबाळे,अप्पा आढाव, जनक तेलगड, रामा राऊत, नारायण तातोडे, बाभळगाव, राजेवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित.