जिल्हा कृषी कार्यालयाचे आवाहन
बीड (रिपोर्टर) खरीपाचा हंगाम सुरू होत आहे. शेतकर्यांनी खते आणि बियाणे खरेदी करत असताना संबंधित दुकानदारांकडून पक्क्या पावत्या घेऊनच खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
खरीप हंगामास प्रारंभ होत असून खते-बियाणे व किटक नाशके खरेदी करत असताना शेतकर्यांनी संबंधित दुकानदारांकडून पक्क्या पावत्या घ्याव्यात. फसवणुक होऊ नये यासाठी शेतकर्यांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणाची खरेदी करावी असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.