फुलोर्यावरील सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता
पात्रुड (रिपोर्टर): यावर्षी हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असून गेल्या काही दिवसांपासून पावसात खंड पडल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.तर सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्यांची पिके जगविण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू असल्याचे चित्र माजलगाव तालुक्यात दिसून येत आहे.
शेतकर्यांनी यावर्षी सोयाबीनसह ज्वारी, तूर, मूग, उडीद या पिकांची अल्प प्रमाणात का होईना, लागवड केली आहे. सुरुवातीला पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपातील पेरणी यावर्षी उशिरा झाली. पेरणीनंतर थोडं फार पावसाने साथ दिली काही दिवसांपासून पावसाने 20 ते 25 दिवसांपासून पावसात खंड पडला असून पुरेशा व दमदार पावसाअभावी अगदी, फुलावर आलेल्या सोयाबीन पिकाला फटका बसत आहे.दमदार व पुरेसा पाऊस असल्यास सोयाबीनचे पीक निश्चितपणे चांगल्याप्रकारे येऊ शकते. मात्र पावसातील खंडामुळे या पिकाचा फुलोर गळून उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची भीती शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.