आष्टी (रिपोर्टर): जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.यामुळे राज्यभरात वातावरण चांगलेच तापले आहे.जालन्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.आष्टी तालुका ही कडकडीत बंद ठेवून सकाळीच सर्व सकल मराठा बांधवांकडून निषेध नोंदवून तहसिलदार प्रमोद गायकवाड,पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यातील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून पुकारलेल्या बंदला प्रतिसाद दिला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
जालना येथे झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज बंद पाळण्यात येत आहे. या घटनेचे आज आष्टीत तालुक्यात पडसाद उमटत आहेत.सर्व सकल मराठा बांधवांनी जालना येथे मराठा आंदोलकावर झालेल्या अमानूष लाठीचार्ज च्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता निषेध नोंदवला तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले मोठ्या प्रमाणावर सर्व सकल मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.अत्यावश्यक सेवा वगळता आष्टी शहर ,कडा शहर कडकडीत बंद पाळण्यात आले यावेळी जियाभाई बेग,अॅड.भाऊसाहेब लटपटे,सुनिल रेडेकर,भागचंद झांजे, जालिंदर वांढरे, डॉ.नदीम शेख,अनिल ढोबळे, कन्हेरे सर,विनाश जगताप, सरपंच अशोक मूळे,आत्माराम फुंदे,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.