गेवराई (रिपोर्टर) माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित राम कथा आणि भव्य किर्तन महोत्सव मंडप उभारणीचा शुभारंभ श्रीक्षेत्र रामगड संस्थांचे मठाधिपती ह.भ.प. श्री. योगीराज महाराज आणि चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती ह.भ.प.श्री. मसन्नाथ महाराज यांच्या शुभहस्ते आणि ईतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी ह.भ.प.योगीराज महाराज यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यास शुभाशिर्वाद दिले. माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने राम कथा आणि भव्य किर्तन महोत्सव होणार आहे. या सर्व कार्यक्रमाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ श्रीक्षेत्र रामगड संस्थांचे मठाधिपती ह.भ.प. श्री. योगीराज महाराज आणि चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती ह.भ.प.श्री. मसन्नाथ महाराज यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिवनगरी र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे संपन्न झाला. यावेळी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे भाऊसाहेब नाटकर, पाटीलबा मस्के, जगन पाटील काळे, बाबुराव जाधव, कुमारराव ढाकणे, आप्पासाहेब गव्हाणे, सुभाष मस्के, अड. येवले, पांडुरंग कोळेकर, परमेश्वर खरात, श्रीराम आरगडे बाबुराव काकडे, श्री.सोलोने, अंकूश गायकवाड, रामदास मुंडे, संदीपान दातखीळ, गोरक्ष शिंदे, शांतीलाल पिसाळ, अनिरुद्ध तौर, उत्तमराव मोटे, अशोक ढास, विजय करपे, संभाजीराव पवळ, संजय जाहेर, जेष्ठ पत्रकार शिवाजी ढाकणे यांच्यासह सर्व समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.