धारूर (रिपोर्टर): गायरान जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने धारूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. गायरान जमीनीचा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास मंत्रालयात घुसून शासनाला जाब विचारला जाईल, असा इशारा डॉ. ओव्हाळ यांनी दिला आहे.
गायरान जमीनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे, मात्र हा प्रयत्न कदापीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही तसेच दलित समाजावर अन्यायाच्या घटना वाढू लागल्या आहेत. नांदेडमधील अक्षय भालेराव नावाच्या तरुणाला जिवे मारण्यात आले त्याचबरोबर इतरही काही घटना राज्यामध्ये घडलेल्या आहेत. या सर्व घटनांच्या निषेधार्थ आज धारूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली.