पाच ठिकाणी केंद्रीय दुष्काळ पथकाने केली पाहणी
भैय्यासाहेब तांगडे l वडवणी
साहेब, शेतातील पिक पावसा अभावी गेले, कपाशीचे पिक फक्त एकरी क्विंटल भर निघाले असून यावर्षी उत्पादन घटले आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असून एक महिनाच कसाबसा पुरेल एवढाच पाणीसाठी आहे. जनावरांना चारासह छावण्या उभा करुन द्याव्यात यासह अन्य मागण्या करत वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकापुढे मागणी केली आहे.
याबाबात आधिक माहिती आशी कि,वडवणी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील दुष्काळी परस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी केंद्रीय दुष्काळ पथक जिल्ह्यात डेरेदाखल झाले आहे. यामध्ये केंद्रीय बागवानी विकास मिशनचे उपसचिव मनोज के., केंद्रीय विकास मंत्रालयाचे सहा. सचिव मोती राम आणि निती आयोगाचे संशोधक एस.सी. मीना यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला सोबत घेऊन पथकाने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वडवणी तालुक्यातील चौफाळदरा व वडवणी तसेच मोरवड फाटा, पुसरा येथील फळ बागासह खरीप हंगामातील कापूस, तुर यासह अन्य पिकांची पाहणी केली आहे. तर वडवणी, मोरवड, पुसरा याठिकाणच्या शेतकऱ्यां सोबत पिक पाहणी करत संवाद देखील साधला आहे.
यावेळी पथकाने शेती विषयी आणि पिक उत्पादना विषयी चर्चा करत कापसाने यंदा एकरी किती क्विंटलचा उत्तारा दिला आहे? पाण्याचे नियोजन आता कसे आहे ? पुढील काळात कसे असेल ? जनावरांच्या चारांचा प्रश्न काय आहे. यासह अन्य बाबीची विचारपुस करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांने शेती विषयीची दहकता सांगत आसताना साहेब, शेतातील कापुस, सोयाबिन, तुर सह अन्य खरीप हंगामातील पिके पुर्ण पावसा आभावी वाया गेले आहेत. शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला असल्याने आमचे जगणे हे शेतीवरच अंवलबून आसल्याने शासनाने मदत करावी तसेच मानवीसह जनावरांना महिनाभर कसाबसा पुरेल एवढाच पाणीसाठा असून महिनाभरा नंतर पाणी नसणार आहे त्यासाठी जनावरांना पाणी, चारा सह छावणी सरकारने उभारुन द्यावी अशी मागणी करत पतंप्रधान पिक विमा योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत आणि ज्यांना मिळाले आहेत ते तंटपुज्य असून यामध्ये १००% वाढ करण्यात यावी. लंम्पी आजारात अनेक शेतकऱ्यांचे जनावरे दगावली असल्याने शासनाकडून अद्यापही मदत मिळालेली नाही हि मदत द्यावी यासह अन्य मागण्या देखील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेती पिकांची पाहणी करत आसताना केंद्रीय दुष्काळ पथक पाहणी करणारे अधिकारी देखील आवक होत शेतकऱ्यांची बाजू सविस्तर ऐकुन घेत नोट करण्यात आली आहे. पाहणी करत शेतकऱ्याचे सदरील म्हणणे आणि प्रश्नाचा आवाहल केंद्रीय सरकारकडे दाखल केला जाईल असं मत देखील पत्रकारांना सांगितले आहे. यावेळी पथका सोबत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधिकारी जेजुरकर, माजलगांव उपविभागाच्या अधिकारी डाँ. निलम बाफना, तहसिलदार संभाजी मंदे, बिडीओ विठ्ठल नागरगोजे, तालुका कृषी अधिकारी गर्जे यांच्यासह जिल्हा व तालुका संपुर्ण प्रशासनाची उपस्थिती होती.
“””””””””””” चौकटी घेणे “”””””””””””””
** दोन तलावाची पाहणी **
शेती पिकाच्या पाहणी सोबतच दुष्काळ पथकाने वडवणी शहरा जवळील रेणुका माता लगत असणारा तलाव व त्यांच्याच पुढील असणारा तलावाची पाहणी केली आहे. यावेळी दोन्ही तलावाची माहिती घेत याठिकाणी थेंब भर देखील पाणी साठा नसल्याचे निदर्शनास आले असल्याने पुढील काळात पाणी टंचाईला उद्भभवणार आहे. हे स्पष्ट देखील पथकाने नमुद केले आहे.
** जलजीवनची तक्रार **
दुष्काळी पथक पुसरा या गांवी दाखल झाले तेव्हा पाणी प्रश्नावर शेतकऱ्या सोबत चर्चा करण्यात आली तेव्हा येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री जलजीवन मशिन आंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजना संपुर्ण फेल झाली आहे. काम पुर्ण होऊन देखील गांवाला सध्या पाणी टंचाईला समोरो जावे लागत असुन याबाबतची तक्रार दुष्काळ पथका समोर जिल्हाधिकारी यांच्यासमावेत केली आहे.